नवी दिल्ली,28 डिसेंबर (पीएसआय)
देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नुकतेच आपण देश सोडून कुठे जाणार नाही, असे सांगून सर्वांना खूश केले आहे, परंतु जास्तीत संख्येने उद्योगपती यावर विश्वास ठेवत नाहीत. देशाच्या सध्याच्या स्थितीवर ते एवढे नाराज आहे की, लवकरात लवकर आपले सामान घेऊन येथून निघून जाऊ इच्छित आहेत. त्यांच्या नाराजगीचे सर्वात मोठे कारण भ्रष्टाचार आणि लालफीतशाही आहे. उद्योग जगताची ही नाराजगी नक्कीच देशाला महागात पडू शकते.